MARATHI KAVITA

आई - बाबा
आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली,
बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली,
आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे



जाते म्हणतेस हरकत नाही 
कढत अश्रू पाहून जा 
नाते तोडतेस हरकत नाही 
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना 
हीच एवढी विनंती 
हसते आहेस हरकत नाही 
बुडती नाव पाहून जा 
जाळते आहेस हरकत नाही 
जळणारे गाव पाहून जा




तुझ्या सुंदर आठवणीत
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला



अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी




जाताना एकदा तरी नजर
वळवूनजा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा,
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी एकदा फुलवून जा,
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून
जा,




रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं
हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं




पांढय्रा पांढय्रा दुधाची
मऊ मऊ साय ,
काय आमची आटवण
येते कि नाय ,
सुंदर सुंदर हरणिचे
वाकडे तिकडे पाय ,
S M S नाय
Miss call नाय
मोबाईल विकला कि काय.



अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही...
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही...
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.




रागवू नकोस मला मनवता येणार नाही,
लपवू नकोस मला ओळखता येणार नाही,
डोळ्यात पाणी नको आणूस मला बघवणार नाही,
दूर जाऊ नकोस मला जगता येणार नाही,
उदास होऊ नकोस मला हसता येणार नाही,
हृदय तोडु नकोस मला जोडता येणार नाही,
साथ कधी सोडु नकोस मला तुला कधी सोडता येणार नाही,
रूसवा धरु नकोस मला शब्द सापडणार नाही,
तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही.
असं मी म्हणतं नाही कारण.
तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणारनाही।




तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??????
अश्रु ही कसे झर झर झरतात...
तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात...

तुझी आठवण आली की माहितेय काय होते?????
स्पंदनंचा ताल ताल हरवतो
प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो

तुझी आठवण आली की माहितेय काय होते?????
माझे शब्द नी शब्द विखुरतात
माझ्या कविता ही मजला ना स्फुरातात




का मलाच तुझी इतकी आठवण येते
माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते
प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते
तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते
स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते
बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते
रोज रात्री निजतांना उचकी गं लागते
तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते
प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते
हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..





सगळ्यात जास्त काय करायला आवडतं तुला....??? "
मी म्हटलं, " स्वप्न पहायला.. यावर सगळे हसू लागले.. वेडी आहेस म्हणाले
मीही हसले .. पण खरच..
मला स्वप्नं पहायला खूप आवडत..

कारण ती एकच जागा उरलीये आता
जिथे तो अजुनही भेटतो मला
.
.
.
अगदी न चुकता....!






काही मुलं, मुलींना'आयटम'म्हणून बोलतात,
जे मुलींना बिलकुल आवडत नाही..

पण रागावण्याचं कारणचं नाही,
कारण...,

त्यातला छुपा गर्भित अर्थ असा होतो..
आयटम म्हणजे माल,
माल म्हणजे पैसा..
आणि पैसा म्हणजे लक्ष्मी,
आणि मुलीला तर
घराची लक्ष्मी म्हणतात..
मग रागवायचा प्रश्न येतोचं कुठे ?

"रिश्ता वही सोच नई"





स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो...
जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो...

कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो...
अन स्वप्नातल्या तुला,परत सत्यात पाहण्यासाठी...

जीव हा माझा, खरच खूप तळमळतो ...
खरच खूप तळमळतो ...




तिला आवडतं माझ्याशी बोलायला
कारण मी बोलका आहे
तिच्या मनातला समजत
नाही तिला
मी बोलून जातो तिच्या
एक एक विचारांची
वहीच मी उघडतो
ती म्हणते बोलत जा ना
माझ्याशी मी खूप एकटी
आहे रे आपल्यां मध्ये असूनही
मी खूप परकी आहे रे
तुझे बोलणं आपलं वाटतं




कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत
जावे
आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे
नसो कोणीही आपले आपण मात्र
कोणाचेही व्हावे ...




मी तुझाचं आहे गं सखे,
हे तुला सांगायची गरज नाही..
कारण ?????
ह्रदयात तु बसली अशी की,
तुझी आठवण काढल्याशिवाय एकही क्षण जात
नाही.




जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसने...
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे...