GAMBHIR KAVITA

माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडे सारखा बघत 
राहतो माझी चुकी नाही कि मी तुला सारखा कॉल
आणि मेसेज करतो माझी चुकी नाही कि मी तुला
इतका लाईक करतो माझी एवढीच चुकी आहे कि मी
तुझ्यावर माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त प्रेम करतो.

लहाणपणी हाताच्या मुठीत गच्च पकडलेली 5 रूपयाची #नोट आणी तोंडातुन #अखंड चाललेला जप....
.
"दोन रुपयाची #साखर एक रुपयाची #पावडर आणी बाकिचे #पैसं परत"....

.
असा एका हातात चड्डी धरून पळत पळत केलेल्या #बाजाराची सर आजच्या #माॅल मधील शाॅपिंग ला नाही रे गड्यानों

किती दिवसाचे आयुष्य असते आजचे
अस्तित्व उद्या नसते. मग जगाव ते
हासुन-खेळुन. कारण या जगात उद्या
काय होईल. ते कुणालाच माहित नसते

आयुष्य खुप थोडं असतं, त्यात आपल्याला
खुप काही हवं असतं, जे हवं असतं, ते
मिळत नसतं आणि ते मिळालं तरी खुप
काही कमी असतं, कारण कारण चांदण्यांनी
भरुन सुद्धा आपलं आभाळ रिकामचं असतं

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात
ति आपोआप गुंफली जातात
मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात
काही जण हक्काने राज्य
करतात यालाच तर मैञी म्हणतात

आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली
आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे
मागीतलंहोतं, तेमागणं आहेस तु.

आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे

हातात तलवार घेउन लढण्याची कधी गरजच
पडली नाही कारण ढालीसारखे येवढे मित्र
समोर उभे राहीले की आजवर कुठल्या
शत्रूची माझ्यावर नजरच पडलेली नाही!

समृध्दीच्या कणाकणात सजावी दीप
हासत, नाचत, गात यावी दीप
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे
शुभेच्छांच्यने अवघे अंगण तुमचे भरावे

रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं
हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं

माझ्याकडे कारण नाही की,तू मला का आवडतेस
माझ्याकडे प्रुफ नाही की, मी तुझ्यावर प्रेम
करतो माझ्याकडे माप नाही की, मी तुझ्यावर 
इतका विश्वास ठेवतो माझ्याकडे फक्त
एवढेचं आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत
मीतुझाच आहे हे ठाम सांगू शकतो.

प्रेम हे फुलपाखरा सारखे आहे जेव्हा
तुम्ही त्याला पकडायला जाता तेव्हा ते
दुसरीकडे उडून जाते पण जेव्हा तुम्ही
शांत असता तेव्हा ते हळूच येते आणि 
तुम्हाला स्पर्श करते, तुमचे होउन जाते
म्हणून वाट बघुयात आपापल्या फुलपाखराची